उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन
पुणे: शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांनी ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.
जुन्नरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या दुर्वेवी घटनेत अफसर इनामदार यांची दोन्ही मुले खेळत असताना शेततळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण जुन्नर तालुका हळहळला, त्याच वेळी १ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जुन्नर येथे गेले असता स्थानिक शिवसेना नगरसेवक मयुर महाबरे यांनी ही घटना आमदार शरद सोनवणे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारातून वेळात वेळ काढून ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
त्यानुसार काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, स्थानिक नगरसेवक मयुर महाबरे आणि स्थानिक शिवसैनिकांनी ईनामदार कुटुंबाची भेट घेऊन पाच लाखांची ही मदत त्यांना सुपुर्द केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून इनामदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना दुर्दैवी असून स्वतःची मुले गमावण्याचे दुःख काय असते ते मला चांगले
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…