महाराष्ट्र

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन

पुणे: शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांनी ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.

जुन्नरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या दुर्वेवी घटनेत अफसर इनामदार यांची दोन्ही मुले खेळत असताना शेततळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण जुन्नर तालुका हळहळला, त्याच वेळी १ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जुन्नर येथे गेले असता स्थानिक शिवसेना नगरसेवक मयुर महाबरे यांनी ही घटना आमदार शरद सोनवणे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारातून वेळात वेळ काढून ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

त्यानुसार काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, स्थानिक नगरसेवक मयुर महाबरे आणि स्थानिक शिवसैनिकांनी ईनामदार कुटुंबाची भेट घेऊन पाच लाखांची ही मदत त्यांना सुपुर्द केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून इनामदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना दुर्दैवी असून स्वतःची मुले गमावण्याचे दुःख काय असते ते मला चांगले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

3 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

9 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

9 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

9 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

9 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago