मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच पवार कुटुंबीयांबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि राजकीय संस्कारशून्य आहे. अशा विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.
पार्थ पवार हे शरद पवार साहेबांना केवळ कुटुंबीय म्हणून भेटतात, असे विधान करून दरेकर यांनी केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आणि विश्वासावरच आघात केला आहे. पवार कुटुंबीयांनी गेली अनेक दशके राज्याच्या विकासासाठी, शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र कार्य केले आहे. त्यांच्या योगदानाचा अवमान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाचा अपमान होय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार यांसारखे सक्षम, अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे अशा निराधार, तथ्यहीन वक्तव्यांमुळे पक्षाची ताकद कमी होणार नाही. उलट, अशा विधानांतून दरेकर यांची राजकीय हतबलताच जनतेसमोर स्पष्ट होत आहे.
स्वतःच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आणि अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र महाराष्ट्राची जनता सर्व काही पाहत आहे आणि योग्य वेळी योग्य उत्तर देईल, याची आम्हाला खात्री आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…