महाराष्ट्र

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

२५ शाळांवर निधी लाटल्याचा ठपका

राज्यातील २५ निवासी शाळांनी कागदोपत्री विद्यार्थ्यांची संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीनंतर या शाळांची मान्यता रद्द करण्यात आली. त्याविरोधात संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली. न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार संबंधित संस्थांना सुनावणी देण्याचे निर्देश दिले होते.

सचिवांचा निर्णय कायम

न्यायालयाच्या आदेशानंतर विभागाच्या सचिवांनी सर्व संबंधित संस्थांची सविस्तर सुनावणी घेतली. सुनावणीत संस्थांचे युक्तिवाद फेटाळण्यात आले आणि पूर्वीचा निर्णय कायम ठेवत सर्व २५ शाळांची मान्यता नाकारण्यात आली.

सचिवांच्या आदेशात नमूद करण्यात आले की –

चुकीची व दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करण्यात आली.

विद्यार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही.

शासनाचे आर्थिक नुकसान झाले असून ते तातडीने वसूल करावे.

संबंधित संस्था व शाळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

संचालकांकडून पुनर्मूल्यांकनाचे आदेश

मात्र सचिवांचे स्पष्ट निर्देश असतानाही विभागाच्या संचालकांनी पुन्हा गुणवत्ता मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रद्द झालेल्या शाळांना पुन्हा मान्यता देण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.या घडामोडींमुळे विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या निर्णयामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा रंगली आहे.

योजनेची पार्श्वभूमी

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना ही योजना २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण विभाग (VJNT) मार्फत धनगर समाजातील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आणि दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.

दरम्यान, सचिवांच्या निर्णयानंतरही पुनर्मूल्यांकनाचे आदेश का देण्यात आले, याबाबत शासनाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

11 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

12 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

12 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

15 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

16 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

19 तास ago