महाराष्ट्र

अजित दादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले; सुप्रिया सुळेंचा तो सवाल; सखोल चौकशीची मागणी

बारामती: राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हा अपघात नसून व्यापक कट आणि घातपात असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणावर रोहित पवार यांनी आतापर्यंत तीन पत्रकार परिषद घेतल्या असून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय मुद्दे उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

DGCA च्या निर्णयावर प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, DGCA च्या प्राथमिक निर्णयानंतरही संपूर्ण सत्य बाहेर यावे यासाठी तपास पूर्ण व्हायला हवा. “मी विमान वाहतूक मंत्रालय आणि Rohit Pawar यांचे आभार मानते. त्यांनी हा विषय मुद्देसूद पद्धतीने मांडला. आमच्या घरातील पुरुष गेला आहे. हे दु:ख केवळ आमचं नाही, तर इतर पाच कुटुंबांचंही आहे. अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये ही पांडुरंगाकडे प्रार्थना आहे,” असे त्या म्हणाल्या.

हवाई वाहतूक ही अत्यंत गांभीर्याची बाब असून, अशा घटना घडत असतील तर सखोल तपासणी झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. “अजून पूर्ण अहवाल समोर येऊ द्या. ही केवळ सुरुवात आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

संसदेत मुद्दा उपस्थित करण्याची भूमिका

येणाऱ्या दहा दिवसांत संसद अधिवेशन सुरू होत असून, या अपघाताचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. “या त्रुटी कोणामुळे झाल्या, हे सर्व समोर आले पाहिजे. सर्व विमानांचे ऑडिट झाले पाहिजे. नुकतेच झारखंडमध्येही विमान कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे दादांचा अपघात, झारखंडमधील अपघात आणि एकूणच हवाई सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा व सरकारचे अधिकृत निवेदन आवश्यक आहे,” अशी मागणी त्यांनी केली.

कंपन्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे

पत्रकार परिषदेत विमान कंपन्यांच्या कथित मनमानी कारभारावरही त्यांनी टीका केली. “सर्व कंपन्या नियमांनुसार चालल्या पाहिजेत. कोणाच्या मनमानीने काहीही होऊ नये. सध्या चौकशी सुरू आहे, त्यामुळे अंतिम निष्कर्ष काढणे योग्य नाही. मात्र, पुढील आठ दिवसांत वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, रोहित पवार यांनी लावून धरलेल्या या मुद्द्यामुळे राज्यातील राजकारण तापले असून, आगामी संसद अधिवेशनात या प्रकरणावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

7 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

7 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

7 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

7 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

12 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

13 तास ago