महाराष्ट्र

राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची नवी खेळी

कर्नाटक: कर्नाटकमधील महादेवपूरा मतदारसंघात तब्बल एक लाख 250 बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. बोगस मतदारांद्वारे निकाल बदलण्यात आला, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता.

बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट मतदार याद्यांद्वारे पुरावेच सादर केले. एकाच घरात 80 मतदार राहत असल्याचे त्यांनी समोर आणले.

राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोग मत चोरी करत असल्याचा आरोप केल्याने मोठी खबळबळ उडाली. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी केलेले आरोप सत्य आहेत असे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, राहुल यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईट बंद केली तसेच महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशाच्या मतदार याद्या गायब केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राहुल गांधी म्हणाले, आम्ही दिलेल्या डेटाबाबत लोक निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रश्न विचारत आहे तर आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली. मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या वेबसाईट बंद केल्या आहेत. त्यांना माहीत आहे की या डेटा संदर्भात प्रश्न विचारले तर त्यांचा संपूर्ण ढाच्या कोसळेल.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशाच्या मतदारयाद्या गायब केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, हरियाण निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

एकाच बापाची 42 मुल

मतदार याद्यांचा हवाल देत जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, रामकमलदास याला 80 पोरं. म्हणजे त्याच्या बायकोला एका वर्षात तीन पोरं झाली. मी ती यादी ट्विट देखील केली आहे. एकाच बापाची 42 पोरं , वय सगळ्यांचे 29 ते 67 च्या आसपास आहेत. अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला काढून रामकमलदासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघाला, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

12 मिनिटे ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

16 मिनिटे ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

26 मिनिटे ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

9 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

9 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

9 तास ago