मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतर्कतेने करण्यात यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. योजनेचा कोणत्याही स्तरावर गैरफायदा होणार नाही, याची दक्षता घेत प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गोगावले यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेतला. यावेळी रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, आयुक्त अनिता मेश्राम, सहसचिव अतुल कोदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देताना मंत्री गोगावले यांनी प्रशासकीय त्रुटींमुळे मजुरांची देणी थकू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे स्पष्ट केले. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर निधी हस्तांतरण आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया विहित कालावधीत व पूर्ण पारदर्शकतेने पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
योजनेतील सर्व कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर करावीत आणि प्रत्येक कामाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
योजनेची माहिती तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पुढील महिन्यापासून विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि गावपातळीवरील लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातही अशाच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी दिली.
दरम्यान, कोकण विभागाची भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन योजनेतील कामांच्या स्वरूपात आवश्यक बदल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. स्थानिक परिस्थितीनुसार योजना अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…
पुणे : जन्म देऊन आयुष्यभर सांभाळ करणाऱ्या आईचीच मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी…
परदेशात ‘ब्रँड इंडिया’, देशात गांधीविरोध; हा राजकारणाचा दुटप्पीपणा की सोयीचा इतिहास? मुंबई: महात्मा गांधींचे नाव…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक…