मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतर्कतेने करण्यात यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. योजनेचा कोणत्याही स्तरावर गैरफायदा होणार नाही, याची दक्षता घेत प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गोगावले यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेतला. यावेळी रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, आयुक्त अनिता मेश्राम, सहसचिव अतुल कोदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देताना मंत्री गोगावले यांनी प्रशासकीय त्रुटींमुळे मजुरांची देणी थकू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे स्पष्ट केले. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर निधी हस्तांतरण आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया विहित कालावधीत व पूर्ण पारदर्शकतेने पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
योजनेतील सर्व कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर करावीत आणि प्रत्येक कामाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
योजनेची माहिती तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पुढील महिन्यापासून विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि गावपातळीवरील लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातही अशाच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी दिली.
दरम्यान, कोकण विभागाची भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन योजनेतील कामांच्या स्वरूपात आवश्यक बदल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. स्थानिक परिस्थितीनुसार योजना अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई:…
शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक…
रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया नागपूर: 18…
शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…
धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…
शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार…