महाराष्ट्र

ते ब्रँड ब्रँड करत असले तरी तो ब्रँड आम्ही संपवणार; भाजप नेते प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर वार

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे असंही ते म्हणाले आहेत.

स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ठाकरे बँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीतच्या मुद्यावर लाड यांनी ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरे यांना या निवडणुकीबाबत कल्पनाही नसेल. पण उद्धव ठाकरे ब्रँड ब्रँड असं करत आहेत. सत्ता आल्यानंतर आदित्य ठाकरे कोण मनसे असं म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे त्यांच्या पाया पडायला जात आहेत अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

माझ्या पॅनलमध्ये सर्वसामान्य जनता आहे. तो जो ब्रँड आहे तो आम्ही हरवून बसलो आहोत. ट्रायल बेस युती आहे का हे मला माहिती नाही, मात्र सहकारांमध्ये राजकारण आणायचं नसतं. केवळ संस्थेचा विचार करायला पाहिजे. यांची 20-25 वर्ष सत्ता होती. तुम्ही केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार कोटीचे कार्यालय 24 कोटीला घेतले. पैसे घेऊन यांनी काय साध्य केलं? असा सवाल लाड यांनी लगावला. यावर आता पोलिसांनी नोटीस देखील काढली आहे, भ्रष्टाचाराचा हिशोब त्यांना द्यावा लागेल असे लाड म्हणाले.

संजय राऊत यांचं चालल तर ते डोनाल्ड ट्रम्प बरोबरही उद्धव ठाकरे यांची युती करतील असा टोला लाड यांनी लगावला. उद्या उद्धव ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले तर टेरिफ वाढला तर त्यावर आश्चर्य वाटायला नको असे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेशी नसून बेस्ट कामगाराच्या सन्मानाची असल्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. 25 वर्ष बेस्ट कामगारांना वेठबिगारांसारखे गृहीत धरलं. त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घेता येईल का? कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना काय आधार देता येईल का? हे आम्ही पाहत आहोत.

मिल कामगारांना घर मिळतात मग बेस्ट कामगारांना आम्ही घर का देऊ शकत नाही? असा विचारच कधी झाला नाही. म्हणून बेस्ट कामगारांच्या आयुष्याचा वृद्धी आणण्यासाठी पाच युनियनला सोबत घेऊन आम्ही समृद्धी पॅनल सामोरं जात आहोत. त्यांना कामगारांचं काही देणं घेण नाही. राज ठाकरेंची गरज आधी त्यांना लागली नाही. पण आता गरज लागत आल्यानं हात पुढे करण्यात आला आहे. कामगार प्रसाद लाड यांच्या मागे उभे राहतील असे दरेकर म्हणाले. राज ठाकरे येतात का जातात याची घाई राऊत यांना लागली आहे म्हणून त्यांचा जप सुरु आहे असंही ते म्हणाले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago