महाराष्ट्र

ते ब्रँड ब्रँड करत असले तरी तो ब्रँड आम्ही संपवणार; भाजप नेते प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर वार

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे असंही ते म्हणाले आहेत.

स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ठाकरे बँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीतच्या मुद्यावर लाड यांनी ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरे यांना या निवडणुकीबाबत कल्पनाही नसेल. पण उद्धव ठाकरे ब्रँड ब्रँड असं करत आहेत. सत्ता आल्यानंतर आदित्य ठाकरे कोण मनसे असं म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे त्यांच्या पाया पडायला जात आहेत अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

माझ्या पॅनलमध्ये सर्वसामान्य जनता आहे. तो जो ब्रँड आहे तो आम्ही हरवून बसलो आहोत. ट्रायल बेस युती आहे का हे मला माहिती नाही, मात्र सहकारांमध्ये राजकारण आणायचं नसतं. केवळ संस्थेचा विचार करायला पाहिजे. यांची 20-25 वर्ष सत्ता होती. तुम्ही केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार कोटीचे कार्यालय 24 कोटीला घेतले. पैसे घेऊन यांनी काय साध्य केलं? असा सवाल लाड यांनी लगावला. यावर आता पोलिसांनी नोटीस देखील काढली आहे, भ्रष्टाचाराचा हिशोब त्यांना द्यावा लागेल असे लाड म्हणाले.

संजय राऊत यांचं चालल तर ते डोनाल्ड ट्रम्प बरोबरही उद्धव ठाकरे यांची युती करतील असा टोला लाड यांनी लगावला. उद्या उद्धव ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले तर टेरिफ वाढला तर त्यावर आश्चर्य वाटायला नको असे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेशी नसून बेस्ट कामगाराच्या सन्मानाची असल्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. 25 वर्ष बेस्ट कामगारांना वेठबिगारांसारखे गृहीत धरलं. त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घेता येईल का? कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना काय आधार देता येईल का? हे आम्ही पाहत आहोत.

मिल कामगारांना घर मिळतात मग बेस्ट कामगारांना आम्ही घर का देऊ शकत नाही? असा विचारच कधी झाला नाही. म्हणून बेस्ट कामगारांच्या आयुष्याचा वृद्धी आणण्यासाठी पाच युनियनला सोबत घेऊन आम्ही समृद्धी पॅनल सामोरं जात आहोत. त्यांना कामगारांचं काही देणं घेण नाही. राज ठाकरेंची गरज आधी त्यांना लागली नाही. पण आता गरज लागत आल्यानं हात पुढे करण्यात आला आहे. कामगार प्रसाद लाड यांच्या मागे उभे राहतील असे दरेकर म्हणाले. राज ठाकरे येतात का जातात याची घाई राऊत यांना लागली आहे म्हणून त्यांचा जप सुरु आहे असंही ते म्हणाले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

14 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

14 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

14 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

14 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

19 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

19 तास ago