महाराष्ट्र

ते ब्रँड ब्रँड करत असले तरी तो ब्रँड आम्ही संपवणार; भाजप नेते प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर वार

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे असंही ते म्हणाले आहेत.

स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ठाकरे बँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीतच्या मुद्यावर लाड यांनी ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरे यांना या निवडणुकीबाबत कल्पनाही नसेल. पण उद्धव ठाकरे ब्रँड ब्रँड असं करत आहेत. सत्ता आल्यानंतर आदित्य ठाकरे कोण मनसे असं म्हणाले होते. आता उद्धव ठाकरे त्यांच्या पाया पडायला जात आहेत अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.

माझ्या पॅनलमध्ये सर्वसामान्य जनता आहे. तो जो ब्रँड आहे तो आम्ही हरवून बसलो आहोत. ट्रायल बेस युती आहे का हे मला माहिती नाही, मात्र सहकारांमध्ये राजकारण आणायचं नसतं. केवळ संस्थेचा विचार करायला पाहिजे. यांची 20-25 वर्ष सत्ता होती. तुम्ही केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार कोटीचे कार्यालय 24 कोटीला घेतले. पैसे घेऊन यांनी काय साध्य केलं? असा सवाल लाड यांनी लगावला. यावर आता पोलिसांनी नोटीस देखील काढली आहे, भ्रष्टाचाराचा हिशोब त्यांना द्यावा लागेल असे लाड म्हणाले.

संजय राऊत यांचं चालल तर ते डोनाल्ड ट्रम्प बरोबरही उद्धव ठाकरे यांची युती करतील असा टोला लाड यांनी लगावला. उद्या उद्धव ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले तर टेरिफ वाढला तर त्यावर आश्चर्य वाटायला नको असे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेशी नसून बेस्ट कामगाराच्या सन्मानाची असल्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. 25 वर्ष बेस्ट कामगारांना वेठबिगारांसारखे गृहीत धरलं. त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घेता येईल का? कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना काय आधार देता येईल का? हे आम्ही पाहत आहोत.

मिल कामगारांना घर मिळतात मग बेस्ट कामगारांना आम्ही घर का देऊ शकत नाही? असा विचारच कधी झाला नाही. म्हणून बेस्ट कामगारांच्या आयुष्याचा वृद्धी आणण्यासाठी पाच युनियनला सोबत घेऊन आम्ही समृद्धी पॅनल सामोरं जात आहोत. त्यांना कामगारांचं काही देणं घेण नाही. राज ठाकरेंची गरज आधी त्यांना लागली नाही. पण आता गरज लागत आल्यानं हात पुढे करण्यात आला आहे. कामगार प्रसाद लाड यांच्या मागे उभे राहतील असे दरेकर म्हणाले. राज ठाकरे येतात का जातात याची घाई राऊत यांना लागली आहे म्हणून त्यांचा जप सुरु आहे असंही ते म्हणाले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावावर शोककळा; 11 के व्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी (ता.शिरुर) येथे 11 के व्ही ए विद्युत तार अचानक तुटून ऊसाच्या…

1 तास ago

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…

9 तास ago

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

22 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

24 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

1 दिवस ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

1 दिवस ago