क्राईम

अल्पवयीन विद्यार्थिनीने २३ व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

मुंबई: सध्याच्या काळात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी खाऊन १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने तीच आयुष्य संपवलं आहे. पीडित मुलगी ही मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये शिकत होती. तिने आत्महत्या केल्यामुळ एकच खळबळ उडाली आहे.

मुलगी कोठे राहत होती

पीडित मुलगी ही मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहत होती. मुलीचे वडील व्यावसायिक होते. मुलगी मुंबईतील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत होती. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीवर तिच्या अभ्यासाचं मोठं दडपण होत. ती अनेक दिवसांपासून आजारी होती, तिच्यावर धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

गुरुवारी दुपारी केली आत्महत्या

गुरुवारी दुपारी मुलगी तिच्या खोलीमध्ये होती. तिने अचानक २३ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे. यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले होते. त्यांनी ताबोडतोब मुलीच्या घरच्यांना कळवले. पण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत मुलगी मृत झाली होती. या घटनेमुळे तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांचा नोंदवला जबाब

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या घरी भेट दिली. येथे गेल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला. त्यांनी आपली मुलगी अभ्यासाच्या टेन्शनमुळे दबावात होती असं सांगितलं आहे. मुलीच्या घरच्यांनी कोणावरही संशय व्यक्त न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. बॉडीचे शवविच्छेदन करून कुटुंबाच्या हवाली करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

5 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

5 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago