महाराष्ट्र

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वांनी मैदानात उतराव; आदित्य ठाकरे

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावं, असं आवाहन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, किती वॉर्ड निवडून आणायचे हे आपल्या मेहनतीवर अवलंबून आहे, असं ते म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून ज्याची वाट पाहत होतो, तो काळ आता आला आहे.

वरळीमध्ये सादर केलेलं प्रेझेंटेशन सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देत, आपण केलेली विकासकामं थेट लोकांपर्यंत नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डिजिटल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असून, मिंधे गट व भाजप दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबईत रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला जातो, मात्र केंद्र सरकार नेमकं काय करत आहे, हा खरा प्रश्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. “ते म्हणतात आम्ही काम केलं, पण आपण केलेली कामं ठोसपणे जनतेसमोर मांडली पाहिजेत,” असं ते म्हणाले.

सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी तीन तास दिल्यास जनतेकडून भरभरून आशीर्वाद मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘वोट चोरी’ हा केवळ प्रचाराचा मुद्दा नसून, त्यामागील सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे जे उमेदवार देतील, त्यांना निवडून आणणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, मशाल हे आपलं चिन्ह आणि लढ्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं.“काहीही झालं तरी आपण ही मुंबई महापालिका जिंकायचीच आहे,” असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.*

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

10 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

10 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

10 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

10 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

12 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

12 तास ago