मोहोळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी संपूर्ण राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे निवडणूक प्रशासनाची झोप उडाली आहे.
मोहोळ शहराजवळील एका खाजगी बार व हॉटेलच्या परिसरात चक्क ईव्हीएम मशिन आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मशिन जमा करण्याची घाई सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांना मोहोळजवळील ‘स्वराज्य बार अँड हॉटेल’ परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बारच्या आवारात काही व्यक्तींकडे ईव्हीएम मशिन असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
एका बाजूला मतदानानंतर ईव्हीएम मशिनची सुरक्षा कडेकोट असणे अपेक्षित असताना, दुसऱ्या बाजूला त्या मशिन चक्क खाजगी हॉटेलच्या परिसरात आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उमेश पाटील यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद करत निवडणूक यंत्रणेला जाब विचारला.
प्रकरणाची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि तहसीलदार सचिन मुळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून संबंधित मशिन या ‘राखीव’ (Reserve) असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मात्र निवडणूक नियमांनुसार राखीव ईव्हीएम मशिनची वाहतूक करतानाही कडक पोलीस बंदोबस्त आणि अधिकृत वाहनाचा वापर बंधनकारक आहे. असे असताना या मशिन खाजगी बार-हॉटेलच्या आवारात नेमक्या कशा पोहोचल्या, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…