महाराष्ट्र

वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन फडणवीसांनी जनतेला केले एप्रिल फुल

आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव

मुंबई: भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती मिळवून जनतेला एप्रिल फुल केले, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील वीजेचे दर इतर राज्यांच्या दराशी तुलना करता जास्त आहेत. आधीच महागाई त्यात महागड्या वीज बिलाचे चटके जनता सहन करत आहे. तर स्मार्ट मीटर बसवून जनतेच्या डोक्यावर अधिकचा भार टाकला जात आहे. स्मार्ट मीटरचे वीज बील ३० ते ४० % अधिक आहे. वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन तीन दिवसातच त्या निर्णयाला महावितारणला पुढे करून स्थगिती आणली हा जनतेचा विश्वासघात आहे. नेहमीप्रमाणे वीज बिल कमी करण्याची घोषणाही जुमलाच होता, हे आता स्पष्ट झाले आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, भाजपा युतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत कुठलीही आर्थिक तयारी न करता आश्वासनांची खैरात वाटली. शेतमालाला हमीभाव, शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहिणीला २१०० रुपये देणाच्या वल्गना केल्या पण सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असे सांगत ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणा करा, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले, हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पैशाचे सोंग करता येत नाही, हे माहित होते तर आश्वासनांची खैरात करताना ते कळाले नाही का? असा संतप्त सवाल करून, ही जनतेची क्रूर थट्टा आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

11 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

17 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

17 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

17 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago