महाराष्ट्र

राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता.

कोणत्या कागदपत्रांची गरज आहे.

वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील

1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला

2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र

3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५

शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम

ग्रामीण भागातील अर्जदारांसाठी:

साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र चालेल

प्रपत्र-५ मध्ये सरपंच आणि पोलिस पाटलांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक

शहरी भागातील अर्जदारांसाठी:

१०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र आवश्यक

हे प्रतिज्ञापत्र महा ई-सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र येथे करावे

प्रतिज्ञापत्रात लिहावे लागेल की “माझ्याशिवाय इतर कोणताही वारस नाही

महत्त्वाच्या तारखा

1 ते 4 एप्रिल: चावडी वाचन पूर्ण

21 एप्रिल ते 10 मे: ई-फेरफार प्रणालीवर अर्ज व नोंदणी

10 मे नंतर: वारसनोंदीसह नवीन 7/12 उतारे वितरित

वारसनोंद प्रक्रियेची झटपट झलक

1) मृत व्यक्तीची माहिती व कागदपत्रे तयार करा

2) तलाठ्याकडे प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला आणि प्रपत्र-५ जमा करा

3) ई-फेरफार प्रणालीवर मंजूरी मिळवा

4) मंडलाधिकाऱ्यांची अंतिम संमती

5) नवीन वारसनोंद असलेला 7/12 उतारा मिळवा

सावधान

कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी मूळ मृत्यू दाखला अनिवार्य आहे.

अर्जावर योग्य अधिकार्‍यांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक आहे.

या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या मालमत्तेवर योग्य वारस नोंदवून घ्या तेही मोफत कोणतेही शुल्क न देता तुमचा वारस सातबाऱ्यावर नोंदवा आजच.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

4 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

4 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

4 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

4 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

6 तास ago