Lavc57.107.100
शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे
छत्तीसगड: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडमधील कृषी मेळाव्यात हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत नवे कृषी कायदे आणणार असल्याचं स्पष्ट केलं.
या प्रस्तावित कायद्यांमध्ये बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद असणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. अशा फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून हा गंभीर आर्थिक गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना यापुढे कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारसाठी शेतकरी आणि त्यांचा सर्वांगीण विकास हे सर्वोच्च प्राधान्य आहे. नव्या कायद्यांचा उद्देश शेतकऱ्यांना मध्यस्थ, फसवणूक आणि बनावट कृषी साहित्यापासून संरक्षण देण्याचा आहे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक भातशेतीसोबतच फळे, भाज्या आणि विविध पिके घेण्याचा सल्ला दिला. फळझाडे आणि झाडांची लागवड केल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जात असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांची पिके आणि त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार निर्णायक पावलं उचलणार असल्याचं सांगत, बनावट बियाणे-खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई निश्चित केली जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला.
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…