महाराष्ट्र

बनावट बियाणे-खत विक्रेत्यांची आता खैर नाही; शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे 

छत्तीसगड: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडमधील कृषी मेळाव्यात हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत नवे कृषी कायदे आणणार असल्याचं स्पष्ट केलं.

या प्रस्तावित कायद्यांमध्ये बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद असणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. अशा फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून हा गंभीर आर्थिक गुन्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना यापुढे कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारसाठी शेतकरी आणि त्यांचा सर्वांगीण विकास हे सर्वोच्च प्राधान्य आहे. नव्या कायद्यांचा उद्देश शेतकऱ्यांना मध्यस्थ, फसवणूक आणि बनावट कृषी साहित्यापासून संरक्षण देण्याचा आहे.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक भातशेतीसोबतच फळे, भाज्या आणि विविध पिके घेण्याचा सल्ला दिला. फळझाडे आणि झाडांची लागवड केल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जात असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांची पिके आणि त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार निर्णायक पावलं उचलणार असल्याचं सांगत, बनावट बियाणे-खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई निश्चित केली जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

8 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

10 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

10 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

13 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

14 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

17 तास ago