पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवल

सुनेत्रा पवारांचा इतिहास रचणारा शपथविधी; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.

शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईत आपल्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव अंतिम करण्यात आलं.

या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. पहिला प्रस्ताव सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्याबाबत होता, तर दुसरा प्रस्ताव पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यासंदर्भात होता. हे दोन्ही प्रस्ताव आमदारांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार कुठेही दिसून न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही कौटुंबिक कारणांमुळे आणि पुढील विधींसंदर्भात शरद पवार यांनी पार्थ पवार यांना बारामतीतच थांबण्यास सांगितले होते. त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे.

शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच इतर तीन महत्त्वाची खातीही देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक ही खाती सोपवण्यात आली आहेत. मात्र, अर्थ खाते त्यांना देण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ खाते आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप आग्रही असून राष्ट्रवादीकडूनही या खात्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अर्थ खात्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या हे खाते मुख्यमंत्रीांकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago