पुणे: बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8.15 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, सकाळी 8.45 च्या सुमारास बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यासाठी हा केवळ अपघात नव्हता, तर प्रभावी नेतृत्व अचानक हरपल्याचा क्षण होता.
अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय पुढे येत आहे. हे स्मारक केवळ एका नेत्याचे स्मरणस्थळ नसेल, तर चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे ठिकाण ठरणार आहे.
या दुःखाच्या काळात पवार कुटुंब एकत्र आलेले दिसत आहे. रोहित पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार यांनी सोशल मीडियावरून अजित पवारांच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कुटुंबाची बैठकही झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, प्रचारासाठी घाईघाईत निघालेल्या अजित पवारांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा तो शेवटचा दिवस होता.
रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले की, अजित पवारांना राजकीय श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांनी पाठिंबा द्यावा. दुःखामुळे पवार कुटुंबाला प्रचारात सहभागी होता आले नाही, याची जाणीव मतदार ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, पवार कुटुंबात शरद पवार नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत. कठीण प्रसंगी त्यांनी कुटुंबाला आधार दिला असून, अजित पवार नसतानाही त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे. पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार आणि संपूर्ण कुटुंबाची एकच इच्छा आहे की, अजित पवारांचे भव्य आणि लोकांना सहज भेट देता येईल असे स्मारक उभे राहावे. कारण अजित पवारांचे राजकारणातील योगदान 35 ते 40 वर्षांचे होते आणि ते स्मरणात राहणे हीच खरी आदरांजली ठरेल.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…