महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांचे महाराष्ट्रला भावनिक आवाहन; म्हणाले…

पुणे: बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8.15 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, सकाळी 8.45 च्या सुमारास बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले.  या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यासाठी हा केवळ अपघात नव्हता, तर प्रभावी नेतृत्व अचानक हरपल्याचा क्षण होता.

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय पुढे येत आहे. हे स्मारक केवळ एका नेत्याचे स्मरणस्थळ नसेल, तर चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे ठिकाण ठरणार आहे.

या दुःखाच्या काळात पवार कुटुंब एकत्र आलेले दिसत आहे. रोहित पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार यांनी सोशल मीडियावरून अजित पवारांच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कुटुंबाची बैठकही झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, प्रचारासाठी घाईघाईत निघालेल्या अजित पवारांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा तो शेवटचा दिवस होता.

रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले की, अजित पवारांना राजकीय श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांनी पाठिंबा द्यावा. दुःखामुळे पवार कुटुंबाला प्रचारात सहभागी होता आले नाही, याची जाणीव मतदार ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, पवार कुटुंबात शरद पवार नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत. कठीण प्रसंगी त्यांनी कुटुंबाला आधार दिला असून, अजित पवार नसतानाही त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे. पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार आणि संपूर्ण कुटुंबाची एकच इच्छा आहे की, अजित पवारांचे भव्य आणि लोकांना सहज भेट देता येईल असे स्मारक उभे राहावे. कारण अजित पवारांचे राजकारणातील योगदान 35 ते 40 वर्षांचे होते आणि ते स्मरणात राहणे हीच खरी आदरांजली ठरेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

8 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

16 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

16 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

16 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

16 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

16 तास ago