महाराष्ट्र

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही ठेवलंच नाही. हे लई कलाकार आहेत. आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता शिंदे व अजितदादांचा काटा काढला. अजितदादा पापी आणि रक्ताने माखलेली लोकं सोबत ठेवतात, त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर गेले.”

ते पुढे म्हणाले की, “मराठ्यांचं मतदान अजित पवारांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात त्यांना इतकं कमी यश मिळालं नसतं. दोन नासके लोक सांभाळल्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला. यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं.”जरांगे पाटील यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष टीका करत सवाल उपस्थित केला की, “अजित पवारांना भाजप जवळ का करत नाही, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे.”

दरम्यान, सामाजिक समीकरणांवर भाष्य करताना ते म्हणाले, “मुस्लिम, दलित आणि मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणून मी वारंवार या समाजांना सांगतो की एकदा यांना पायाखाली चेंगरा. २०२९ च्या निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळेल.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी थेट इशारा दिला. “मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अमलबजावणी झाली; पण प्रमाणपत्र वाटप सुरू नाही. मुख्यमंत्री किती दिवस मराठ्यांना वेड्यात काढतात ते पाहू. फक्त जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला सत्तेतून खाली खेचू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.महापालिका निवडणुकीतील यशामुळे हवेत जाऊ नये, असा स्पष्ट संदेश मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

11 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

15 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

18 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

19 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago