मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही ठेवलंच नाही. हे लई कलाकार आहेत. आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता शिंदे व अजितदादांचा काटा काढला. अजितदादा पापी आणि रक्ताने माखलेली लोकं सोबत ठेवतात, त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर गेले.”
ते पुढे म्हणाले की, “मराठ्यांचं मतदान अजित पवारांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात त्यांना इतकं कमी यश मिळालं नसतं. दोन नासके लोक सांभाळल्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला. यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं.”जरांगे पाटील यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष टीका करत सवाल उपस्थित केला की, “अजित पवारांना भाजप जवळ का करत नाही, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे.”
दरम्यान, सामाजिक समीकरणांवर भाष्य करताना ते म्हणाले, “मुस्लिम, दलित आणि मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणून मी वारंवार या समाजांना सांगतो की एकदा यांना पायाखाली चेंगरा. २०२९ च्या निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळेल.”
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी थेट इशारा दिला. “मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अमलबजावणी झाली; पण प्रमाणपत्र वाटप सुरू नाही. मुख्यमंत्री किती दिवस मराठ्यांना वेड्यात काढतात ते पाहू. फक्त जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला सत्तेतून खाली खेचू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.महापालिका निवडणुकीतील यशामुळे हवेत जाऊ नये, असा स्पष्ट संदेश मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…