महाराष्ट्र

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही ठेवलंच नाही. हे लई कलाकार आहेत. आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता शिंदे व अजितदादांचा काटा काढला. अजितदादा पापी आणि रक्ताने माखलेली लोकं सोबत ठेवतात, त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर गेले.”

ते पुढे म्हणाले की, “मराठ्यांचं मतदान अजित पवारांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात त्यांना इतकं कमी यश मिळालं नसतं. दोन नासके लोक सांभाळल्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला. यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं.”जरांगे पाटील यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष टीका करत सवाल उपस्थित केला की, “अजित पवारांना भाजप जवळ का करत नाही, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे.”

दरम्यान, सामाजिक समीकरणांवर भाष्य करताना ते म्हणाले, “मुस्लिम, दलित आणि मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणून मी वारंवार या समाजांना सांगतो की एकदा यांना पायाखाली चेंगरा. २०२९ च्या निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळेल.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी थेट इशारा दिला. “मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अमलबजावणी झाली; पण प्रमाणपत्र वाटप सुरू नाही. मुख्यमंत्री किती दिवस मराठ्यांना वेड्यात काढतात ते पाहू. फक्त जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला सत्तेतून खाली खेचू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.महापालिका निवडणुकीतील यशामुळे हवेत जाऊ नये, असा स्पष्ट संदेश मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago