मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही भाजपने विजय मिळवत भगवा फडकवला आहे.
या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेला दिले असून, या निकालाला त्यांनी “लँडस्लाइड व्हिक्टरी” असे संबोधले. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
“पुण्याचे दादा म्हणजे पुण्याची जनता”
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना, “आता पुण्याचे दादा कोण?” असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी अतिशय समर्पक आणि जनतेचे मन जिंकणारे उत्तर दिले.
“पुण्याचे ‘दादा’ पुण्याची जनता आहे. आम्ही सगळे तिचे सेवक आहोत,”असे एका वाक्यात त्यांनी स्पष्ट केले.
“गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी…”
मुंबईतील निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी पैशाचा वापर झाल्याचा आरोप करत महायुतीला काठावरचे बहुमत मिळाल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“आम्हाला एकशे एकोणीस जागा मिळाल्या आहेत. शिवाय, आमच्या जवळपास १४ जागा अतिशय कमी मतांनी कुठे सात, कुठे पाच, तर कुठे शंभर मतांनी गेल्या आहेत.
पण तरीही पूर्ण बहुमत आमच्याकडे आहे. गेल्या तीन निवडणुकांत एकत्रित शिवसेनेलाही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. तो विक्रम आम्ही मोडला आहे.” यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत म्हणत टीकाकारांना टोला लगावला,
“गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी… अशा म्हणणाऱ्यांवर फार काही बोलायचं नसतं.”
महायुतीचाच महापौर होणार; फडणवीस
उद्धव ठाकरे यांनी, “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले,
“देवाच्या म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या?
वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचाच महापौर होणार. त्यामुळे आमचाच महापौर असेल,”असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…