मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे.
महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले आहे. पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “वरच्या देवानेच महायुतीचा महापौर ठरवला आहे. महापौर कोण करायचा हे एकनाथ शिंदे आणि मी बसून ठरवू.”
महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेतले जाणार का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “महापौर कोण असेल, निवड कधी होईल आणि हे पद किती काळ कोणाकडे राहील, हे सर्व आम्ही दोघे बसून ठरवू. आमच्यात कोणताही वाद होणार नाही. महायुती छान पद्धतीने चालवून दाखवू.”
दरम्यान, महापौर कोणत्या पक्षाचा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी भाजपकडून एवढेच सांगण्यात येत आहे की, मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू असेल. त्यामुळे आगामी काळात महापौरपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…