शिक्षकांनी घेतला थेट अधिवेशनाचा अनुभव
पारनेर: शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत दोऩशे हून २०० सेवानिवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.
त्यावेळी शिक्षकांना ख-या अर्ताने कृतकृत झाल्याचे जानवले.
अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून 19 जुलैला या शिक्षकांचा खासदार नीलेश लंके यांच्या सामावेत प्रवास सुरू झाला. या वेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व या ऐतिहासिक दौऱ्याला सुरूवात झाली.
दिल्लीमध्ये पोहचल्यावर या शिक्षकांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. मंदिरातील भव्य स्थापत्यशैली, संस्कृतीचे दर्शन तसेच संध्याकाळच्या प्रकाश आणि ध्वनी शोमुळे संपूर्ण मंडळी भारावून गेली.
दुसऱ्या दिवशी सर्वांनी लाल किल्ल्याच्या परिसरात दौरा केला. या वेळी त्यांनी मुघलकालीन वास्तुकला, स्वातंत्र्य संग्रमाची पार्श्वभूमी आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाची झलक अनुभवली.या शिखांचे या दौऱ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतीय संसद भवनाला दिलेली भेट. विशेष म्हणजे या दौऱ्याचा दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस होता. शिक्षकांनी संसदेतील प्रत्यक्ष कामकाज अनुभवले.
राज्यसभेच्या सभागृहातील चर्चा, लोकसभेतील प्रश्नोत्तरांची सत्रे मंत्री आणि खासदारांची भाषणे या साऱ्या गोष्टी पाहून शिक्षक अचंबित झाले. यावेळी काही शिक्षकांनी खासदार, मंत्री आणि अधिकारी यांच्याशी थेट संवाद सुद्धा साधला.या संपूर्ण दौऱ्यात खासदार नीलेश लंके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली होती. यात निवासाची सोय, वातानुकूलीत बसद्वारे स्थळ दर्शन, वेळच्या वेळी दर्जेदार जेवण व नास्ता या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्या. कोणत्याही वगोगटाच्या शिक्षकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली.
सेवा निवृत्त एक शिक्षक
निवृत्तीनंतर समाजात दुर्लक्षीत गेलेल्या शिक्षकांना थेट संसद दर्शन हा अनुभव म्हणजे आमचा सन्मान, आदर आणि आत्मिक समाधान देणारा ठरला. आम्ही आमचे आयुष्य इतरांचे भविष्य घडविण्यात घातले. मात्र आमच्याही भूतकाळाची आठवण ठेवणारे समाजात कोणीतरी आहे याची जाणीव आम्हाला आज झाली.
मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण…
वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई:…
शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक…
रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया नागपूर: 18…
शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…
धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…