गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना दिले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमदच्या पायथ्याशी असलेले मारकनार गाव हे गाव नक्षलवाद्यांचे केंद्र होते. स्वातंत्र्यापासून या गावात बस धावली नाही, त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने या गावात बस सेवा सुरु करण्यात आली. बुधवारी गावात बस पाहून गावकरी गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. राज्य परिवहन सेवेचे स्वागत करण्यासाठी गावकरी तिरंगा घेऊन जमले. या सेवेचा फायदा मारकनार, मुरुंभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयरकोठी आणि गुंडुरवाही यासारख्या गावांतील १,२०० हून अधिक रहिवाशांना होईल.
दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले. १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गरदेवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि २७ एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली, असे सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात ४२०.९५ किमी लांबीचे २० रस्ते आणि ६० पूल बांधण्यात आले, अशीही माहिती आहे.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…