महाराष्ट्र

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ‘या’ गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना दिले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमदच्या पायथ्याशी असलेले मारकनार गाव हे गाव नक्षलवाद्यांचे केंद्र होते. स्वातंत्र्यापासून या गावात बस धावली नाही, त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने या गावात बस सेवा सुरु करण्यात आली. बुधवारी गावात बस पाहून गावकरी गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. राज्य परिवहन सेवेचे स्वागत करण्यासाठी गावकरी तिरंगा घेऊन जमले. या सेवेचा फायदा मारकनार, मुरुंभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयरकोठी आणि गुंडुरवाही यासारख्या गावांतील १,२०० हून अधिक रहिवाशांना होईल.

दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले. १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गरदेवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि २७ एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली, असे सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात ४२०.९५ किमी लांबीचे २० रस्ते आणि ६० पूल बांधण्यात आले, अशीही माहिती आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

9 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

14 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

14 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

14 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

14 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

17 तास ago