मुंबई: फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महादेव मुंडे यांचे चमडे, हाड आणि रक्त काढून वाल्मिक कराडच्या आणलं होते, असं बाळा बांगर नावाच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येत गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा आहे, असेही बाळा बांगरने सांगितलं आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संबोधित करत होते.
सुरेश धस म्हणाले, “फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली आहे. गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा मुलगा याचा धाकटा मुलगा यांची नावे बाळा बांगर याने माध्यमांसमोर सांगितली आहेत. बांगर हा वाल्मिक कराडसोबत असायचा. बाळा बांगरने सांगितलं की, मी आकाला भेटायला गेलो तेव्हा तिथे माणसाचे चमडे, हाड काढून आणलं होतं. त्यांचे रक्त सुद्धा तेथील टेबलवर ठेवले होते.”
“महादेव मुंडे यांच्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मग, ज्ञानेश्वरी मुंडे यांची काय चूक आहे? शेवटी पोलीस आयुक्तलायसमोर औषध पिण्याची वेळ आली. गोट्या गित्तेवर मकोका लावण्यात आला आहे. तो वाल्मिक कराडच्या तारखेला न्यायालयात येतो. अशी कारवाई बीडचे पोलीस करत आहेत,” असा संताप धस यांनी व्यक्त केला.
“ज्ञानेश्वरी मुंडे आणि तिचा भाऊ सतीश फड हे दोघेच लढत आहेत. फक्त तपास बदलणे एवढेच काम झाले नाही पाहिजे. बाळा बांगरनं आरोपींची नावे सांगून १५ ते २० होऊन गेले आहेत. एवढ्या दिवसांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. ज्याची नियुक्ती वाल्मिक कराडने केली आहे. त्याच्याकडे महादेव मुंडे यांचा तपास दिला आहे. तो काय तपास करणार आहे? बाळा बांगरनं विधान केल्यावर आरोपी फरार झाले. जे गुंडांना मदत करतात, अशा पोलीस अधिकाऱ्यांना बदललं पाहिजे. पोलीस कर्मचारी हे सरकारी काम करण्यापेक्षा आकाचे काम करतात हे फोन रेकॉर्ड तपासल्यावर उघड होईल,” असा दावाही धस यांनी केला आहे.
लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक…
मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…
सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…
२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…
मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…