महाराष्ट्र

महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करा

ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते.

शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

अ) अध्यक्ष- सामाजिक कार्याचा ५ वर्षाचा अनुभव असलेली महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेली माहिला.

ब) दोन सदस्य- महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशा अशासकीय संघटना / संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती, त्यांच्या पैकी किमान एक सदस्य महिला असावी.

1) त्यापैकी कायद्याची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती.

2) तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्प संख्यांक समाजातील महिला.

अर्जदार ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असावा तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अपहार / गुन्हा दाखल नसावा, अर्जदार यांचे अलीकडील काळातील पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र, वैयक्तिक परिचय पत्र व इतर आवश्यक कागदपत्रासह अध्यक्ष व सदस्यांसाठी परिपूर्ण प्रस्ताव दि.२९ जुलै २०२५ रोजी पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नियोजन भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

10 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

10 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

10 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

10 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

10 तास ago