महाराष्ट्र

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने *चाळीस वर्षे यशोगाथेची* या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने शैक्षणिक २०२४-२०२५ या वर्षात करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी शैक्षणिक वर्ष १९९२ ते २०१० या कालावधीत शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या *माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा* आयोजित करण्यात आला होता.

या विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यी उच्च शिक्षण प्राप्त करून विविध क्षेत्रात आज उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी विविध उत्तम सांस्कृतिक उदा. नृत्य ,लघु नाट्य, भारुड ,मनोगते इत्यादी कलाकृती सादर करत शाळेतील तो एक दिवस मनमुरादपणे आनंद घेत साजरा केला. बऱ्याच वर्षांनंतर सर्वजण एकत्र भेटल्यामुळे प्रत्येकजण भावुक झाला होता. गतकाळातील आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. त्या समयी संस्थेचे अध्यक्ष वसंत यशवंत सावंत यांची आवर्जून आठवण काढली. तसेच संस्थेच्या संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांनी, ‘उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात उज्वल यश मिळवून अव्वल स्थानी असल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.’ असा हा विद्यार्थी स्नेह मीलनाचा कार्यक्रम सर्व विभागांचे विभागप्रमुख, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी कोअर कमिटी सदस्य यांच्या साह्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

40 मिनिटे ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

44 मिनिटे ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

47 मिनिटे ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

57 मिनिटे ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

3 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

3 तास ago