मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन
नागपूर: कापूस, सोयाबिन व तूर या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, धानाला बोनस मिळाला पाहिजे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
“कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारविरोधात आंदोलन केले.
केंद्राचे शेतमालाचे आयात निर्यात धोरण चुकीचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी लावून धरली.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…