महाराष्ट्र

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज; डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी साधनसामग्री, तंत्रज्ञान व निधीची गरज – आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रतिपादन

मुंबई: शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचा सूर आज येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. विधान परिषद उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन: सक्षमीकरणाचे मार्ग” या विषयावर हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.या वेबिनारमध्ये देश-विदेशातील कायदेतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांवरील हिंसाचाराच्या विविध प्रकारांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक कायदे सुधारणा आणि न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील कार्यप्रणालीसाठी लहान आणि व्यापक स्तरावर न्याय व विकास यंत्रणा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

खासदार डॉ. डी. पुरंदेश्वरी यांनी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी अर्थसंकल्पीय नियोजन आणि ‘निर्भया’ योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला. ओडिसा विधानसभा अध्यक्षा सुरमा पाधी यांनी महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि संरक्षणाच्या हक्कांना बळकट करण्यासाठी कायद्याची भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ विदुषी डॉ. पॅम राजपूत यांनी ‘CEDAW’ कराराच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी भेदभावमुक्त प्रणाली विकसित करण्याची गरज व्यक्त केली. लंडनस्थित रेणुका फडके यांनी आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित सामुदायिक जागांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जागतिक दृष्टिकोन मांडला.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी भारतात असलेल्या विविध कायद्यांची माहिती घेऊन महिलांनी आपले हक्क जपावेत आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन केले.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस आणि शासकीय यंत्रणांना लिंगाधारित हिंसाचार व मानवी हक्कांबाबत प्रशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी लिंगसमभाव, विविधता आणि महिलांच्या ओळखीचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.

पुण्यातील क्षेत्रीय कार्यकर्त्या अंजू वाघमारे आणि लहानु आबनावे यांनी ग्रामीण भागातील कामाचे अनुभव मांडले.कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पाठक यांनी केली, तर आभार प्रदर्शन मुग्धा केसकर यांनी केले.या परिषदेत महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता विकास प्रक्रियेत नेतृत्व देणारी शक्ती म्हणून पाहणे आवश्यक असल्याचा सर्वसंमत निष्कर्ष नोंदवण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

50 मिनिटे ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

2 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

2 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

2 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

16 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

16 तास ago