महाराष्ट्र

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असतानाच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक, अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

“मी स्वतः घटनास्थळी उपस्थित असताना ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, अजूनही दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे,” असे अहिर यांनी सांगितले.

बचावकार्यात अनेक अडचणी येत असतानाही अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगत अहिर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत

दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना तातडीचा दिलासा देण्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री मदत निधीतूनही पीडित कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे अहिर यांनी स्पष्ट केले.

कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी

“मुंबईत सुरक्षित घर हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे,” असे सांगत सचिन अहिर यांनी या परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज व्यक्त केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या भागातील प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला’ पुन्हा वेग देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाणार असल्याचेही अहिर यांनी सांगितले.

भविष्यात भूस्खलनासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, तसेच धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज असल्याचे सचिन अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

58 मिनिटे ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

1 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

1 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

1 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

3 तास ago

नांदेडमध्ये शिवसेनेला बळ; असंख्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…

3 तास ago