महाराष्ट्र

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने यंत्रणांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच होल्डिंग पाँड, फ्लड गेट्स कार्यान्वित ठेवणे, दरडप्रवण भागांत संरक्षण जाळी बसविणे, होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आणि झाडे कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुंबई महापालिकेने एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल उभारण्याचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यासाठी बेस्ट आणि एसटी प्रशासनाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मुंबईतील २ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे १,७०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून त्यामुळे रस्ते व खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सुमारे ८० टक्के घट झाल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत १२५ पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत २४ दिवस साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भरतीचे दिवस असणार आहेत. शहरातील ९३४ ठिकाणी पाणी उपसण्यासाठी पंप बसविण्यात आले असून ६५ मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. यंदा स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली असून नियंत्रण कक्षातून त्याचे निरीक्षण केले जाणार आहे.

मुंबईत आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार ‘आपदा मित्र’, एनडीआरएफची ३ पथके आणि नौदलाची ९ पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली.पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

5 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

5 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

5 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

5 तास ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

8 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

9 तास ago