महाराष्ट्र

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने यंत्रणांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच होल्डिंग पाँड, फ्लड गेट्स कार्यान्वित ठेवणे, दरडप्रवण भागांत संरक्षण जाळी बसविणे, होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आणि झाडे कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुंबई महापालिकेने एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल उभारण्याचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यासाठी बेस्ट आणि एसटी प्रशासनाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मुंबईतील २ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे १,७०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून त्यामुळे रस्ते व खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सुमारे ८० टक्के घट झाल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत १२५ पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत २४ दिवस साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भरतीचे दिवस असणार आहेत. शहरातील ९३४ ठिकाणी पाणी उपसण्यासाठी पंप बसविण्यात आले असून ६५ मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. यंदा स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली असून नियंत्रण कक्षातून त्याचे निरीक्षण केले जाणार आहे.

मुंबईत आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार ‘आपदा मित्र’, एनडीआरएफची ३ पथके आणि नौदलाची ९ पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली.पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

55 मिनिटे ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

1 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

11 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

13 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

13 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

14 तास ago