आरोग्य

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही क्रिया गरजेची असते. ही क्रिया पचन तंत्राचा महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे शरीरातून अपशिष्ट पदार्थ बाहेर निघतात. एक निरोगी व्यक्ती रोज टॉयलेटला जाते. त्याशिवाय दिवसातून दोन वेळा आणि आठवड्यातून तीन वेळ संडासला जाणं सामान्य मानलं जातं. पण असे बरेच लोक असतात, जे जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण असं का होतं आणि हे सामान्य असतं का? जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर या लेखात याबाबत जाणून घ्या.

एका दिवसात कितीदा संडास करणं नॉर्मल

रोज पोट साफ होणं हे सगळ्यांसाठी फार गरजेचं असतं. कारण याद्वारे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. जवळपास प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून एकदा संडासला जाणं गरजेचं असतं. पण जर रोज पोट साफ होत नसेल, याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला काही समस्य आहे. दिवसातून तीनदा सुद्धा संडासला जाणं नॉर्मल असतं.

जेवणानंतर लगेच टॉयलेटला जाणं सामान्य आहे का

तुम्ही अशा बऱ्याच लोकांना पाहिलं असेल जे जेवण केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण ही बाब सामान्य आहे का? याबाबत अमेरिकन डॉक्टर सौरभ सेठी सांगतात की, असं होणं फारच सामान्य आहे.

असं का होतं

असं गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स नावाच्या गोष्टीमुळे होतं. जेव्हा अन्न पोटात पोहोचतं, तेव्हा ते कोलनला मूव्ह करण्याचा संकेत देतं. ज्यामुळे तुम्हाला असं जाणवतं की, तुम्हाला टॉयलेटला जाण्याची गरज आहे.

काय कराल उपाय

जर तुम्हाला काही खाल्ल्यावर टॉयलेटला जावं लागत असेल तर प्रयत्न करा की, छोट्या छोट्या भागात खात आणि खूप जास्त खाऊ नका.

आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जसे की, ओट्स, केळी. पूर्ण पिकलेल्या ऐवजी थोडं कच्चं केळ खा.

असे पदार्थ खाणं टाळा जे तुमच्या लक्षणांना ट्रिगर करू शकतात, जसे की, हाय फॅट, मसालेदार आणि कॅफीनयुक्त पदार्थ.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

5 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

5 तास ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

5 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

5 तास ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

9 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

9 तास ago