आरोग्य

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही क्रिया गरजेची असते. ही क्रिया पचन तंत्राचा महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे शरीरातून अपशिष्ट पदार्थ बाहेर निघतात. एक निरोगी व्यक्ती रोज टॉयलेटला जाते. त्याशिवाय दिवसातून दोन वेळा आणि आठवड्यातून तीन वेळ संडासला जाणं सामान्य मानलं जातं. पण असे बरेच लोक असतात, जे जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण असं का होतं आणि हे सामान्य असतं का? जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर या लेखात याबाबत जाणून घ्या.

एका दिवसात कितीदा संडास करणं नॉर्मल

रोज पोट साफ होणं हे सगळ्यांसाठी फार गरजेचं असतं. कारण याद्वारे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. जवळपास प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून एकदा संडासला जाणं गरजेचं असतं. पण जर रोज पोट साफ होत नसेल, याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला काही समस्य आहे. दिवसातून तीनदा सुद्धा संडासला जाणं नॉर्मल असतं.

जेवणानंतर लगेच टॉयलेटला जाणं सामान्य आहे का

तुम्ही अशा बऱ्याच लोकांना पाहिलं असेल जे जेवण केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण ही बाब सामान्य आहे का? याबाबत अमेरिकन डॉक्टर सौरभ सेठी सांगतात की, असं होणं फारच सामान्य आहे.

असं का होतं

असं गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स नावाच्या गोष्टीमुळे होतं. जेव्हा अन्न पोटात पोहोचतं, तेव्हा ते कोलनला मूव्ह करण्याचा संकेत देतं. ज्यामुळे तुम्हाला असं जाणवतं की, तुम्हाला टॉयलेटला जाण्याची गरज आहे.

काय कराल उपाय

जर तुम्हाला काही खाल्ल्यावर टॉयलेटला जावं लागत असेल तर प्रयत्न करा की, छोट्या छोट्या भागात खात आणि खूप जास्त खाऊ नका.

आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जसे की, ओट्स, केळी. पूर्ण पिकलेल्या ऐवजी थोडं कच्चं केळ खा.

असे पदार्थ खाणं टाळा जे तुमच्या लक्षणांना ट्रिगर करू शकतात, जसे की, हाय फॅट, मसालेदार आणि कॅफीनयुक्त पदार्थ.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago