आरोग्य

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही क्रिया गरजेची असते. ही क्रिया पचन तंत्राचा महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे शरीरातून अपशिष्ट पदार्थ बाहेर निघतात. एक निरोगी व्यक्ती रोज टॉयलेटला जाते. त्याशिवाय दिवसातून दोन वेळा आणि आठवड्यातून तीन वेळ संडासला जाणं सामान्य मानलं जातं. पण असे बरेच लोक असतात, जे जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण असं का होतं आणि हे सामान्य असतं का? जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर या लेखात याबाबत जाणून घ्या.

एका दिवसात कितीदा संडास करणं नॉर्मल

रोज पोट साफ होणं हे सगळ्यांसाठी फार गरजेचं असतं. कारण याद्वारे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. जवळपास प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून एकदा संडासला जाणं गरजेचं असतं. पण जर रोज पोट साफ होत नसेल, याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला काही समस्य आहे. दिवसातून तीनदा सुद्धा संडासला जाणं नॉर्मल असतं.

जेवणानंतर लगेच टॉयलेटला जाणं सामान्य आहे का

तुम्ही अशा बऱ्याच लोकांना पाहिलं असेल जे जेवण केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर लगेच टॉयलेटला जातात. पण ही बाब सामान्य आहे का? याबाबत अमेरिकन डॉक्टर सौरभ सेठी सांगतात की, असं होणं फारच सामान्य आहे.

असं का होतं

असं गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स नावाच्या गोष्टीमुळे होतं. जेव्हा अन्न पोटात पोहोचतं, तेव्हा ते कोलनला मूव्ह करण्याचा संकेत देतं. ज्यामुळे तुम्हाला असं जाणवतं की, तुम्हाला टॉयलेटला जाण्याची गरज आहे.

काय कराल उपाय

जर तुम्हाला काही खाल्ल्यावर टॉयलेटला जावं लागत असेल तर प्रयत्न करा की, छोट्या छोट्या भागात खात आणि खूप जास्त खाऊ नका.

आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जसे की, ओट्स, केळी. पूर्ण पिकलेल्या ऐवजी थोडं कच्चं केळ खा.

असे पदार्थ खाणं टाळा जे तुमच्या लक्षणांना ट्रिगर करू शकतात, जसे की, हाय फॅट, मसालेदार आणि कॅफीनयुक्त पदार्थ.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

1 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

1 तास ago

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

12 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

13 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

13 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

14 तास ago