महाराष्ट्र

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार मोठं अनुदान

२०० कोटींच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाला मंजुरी

औरंगाबाद: केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली असून योजनेअंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमातीच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

२०२५-२६ साठी २०४.१४ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, केंद्राचा ६०% आणि राज्याचा ४०% वाटा असणार आहे.

केंद्र: ₹१२२.४८ कोटी

राज्य: ₹८१.६५ कोटी

या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठं अनुदान मिळणार

अनुसूचित जाती-जमाती, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारकांना ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ५०% किंवा ₹१.२५ लाख जी रक्कम कमी असेल ती मिळणार

सर्वसाधारण शेतकरी वर्गासाठी: ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ४०% किंवा ₹१ लाख जी रक्कम कमी असेल ती मिळणार.

अनुदान वितरण

सर्वसाधारण शेतकरी: ₹१६४.२३ कोटी

अनुसूचित जाती: ₹२२.२७ कोटी

अनुसूचित जमाती: ₹१७.६३ कोटी

महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या.

शेती यांत्रिकीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

1 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

1 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

1 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

12 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

12 तास ago