मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी वीज जोडणीअभावी कामकाज सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे आवश्यक वीज जोडणी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, इमारतीची स्वच्छता आणि शासनाने मंजूर केलेली १,०७८ नवीन पदे तातडीने भरण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकल्पात ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी संदर्भ सेवा रुग्णालय एकाच संकुलात कार्यरत होणार आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि ऑनकोलॉजीसारख्या विशेष उपचार सुविधा येथे उपलब्ध असतील. तसेच १६ आधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि एअर ॲम्ब्युलन्ससाठी हेलीपॅडचीही सुविधा असणार आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच अत्याधुनिक आणि मोफत उपचार मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…
टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही…