मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे.
श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात अनेक लोक मांसाहार करत नाहीत. श्रावण महिन्यात रक्षाबंधन, गणेशोत्सव असे अनेक सण साजरा होतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत.
ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी
ऑगस्ट महिन्यात राज्यातील मुंबई सह कोंकण विभागातील शाळांना सलग सात दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरे तर दरवर्षी मुंबई आणि कोकणातील शाळांना गणेशोत्सवाच्या काळात सुरुवातीचे पाच दिवस सुट्ट्या दिल्या जातात.
मात्र यंदा या सुट्ट्यांमध्ये दोन दिवसांची भर पडली आहे. यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 साठी मुंबई आणि कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर म्हणजेच 27 ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
तसेच महाराष्ट्रातील सर्वच शाळांना 15 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंतच्या तीन दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या राहणार आहेत. अशा स्थितीत आता आपण राज्यातील शाळांना कोणकोणत्या तारखांना सुट्ट्या राहणार आणि सुट्टीचे कारण काय त्याची माहिती पाहूया.
9 ऑगस्ट 2025 : रक्षाबंधन निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच शाळांना सुट्टी राहणार आहे.
10 ऑगस्ट 2025 : रविवार असल्याने या दिवशी सर्वच शाळांना सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2025 : या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आणि पारशी नववर्ष निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वच शाळांना सुट्टी राहणार आहे.
16 ऑगस्ट 2025 : या दिवशी गोपाळकाला आणि दहीहंडीचा सण साजरा होईल आणि म्हणूनच राज्यातील सर्व शाळा या दिवशी बंद राहतील.
17 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट 2025 : या दोन्ही दिवशी रविवार निमित्ताने विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्टी राहील.
27 ऑगस्ट 2025 : या दिवशी गणेश चतुर्थी निमित्ताने राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी राहणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना 27 ऑगस्ट पासून सलग सात दिवस म्हणजेच 2 सप्टेंबर 2025 पर्यंत सुट्ट्या राहतील.
शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…