मुंबई: “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सांगत विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी राम शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.
सतेज पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी, रिक्त पदे आणि भरतीतील विलंब या मुद्द्यांमुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या गंभीर प्रश्नांवर केवळ औपचारिक नव्हे, तर स्पष्ट, जबाबदार आणि तथ्याधारित उत्तरे देणे सरकारचे कर्तव्य आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळालाच पाहिजे. लोकशाहीतील उत्तरदायित्व कायम राखण्यासाठी सरकारने या मागणीची तातडीने दखल घेऊन सभागृहात उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडावी, अशी मागणीही सतेज पाटील यांनी आपल्या पत्रातून केलीआहे.
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…