महाराष्ट्र

TET पेपरफुटीप्रकरणी विधानभवनात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे; NSUI चे आंदोलन

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते विधानभवन परिसरात जमले होते. शिक्षणमंत्री दादा भुसे विधानभवनातून बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवण्यात आले. “पेपरचोर सरकार हाय हाय”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “पेपरफुटी करणाऱ्यांना अटक करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी सागर साळुंखे यांनी आरोप केला की, राज्यात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. TET पेपरफुटीप्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सागर साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिस कारवाईनंतरही आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवत विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, TET पेपरफुटीविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्र युवक काँग्रेसने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर आज NSUI ने विधानभवनात आंदोलन छेडले. राज्यातील विविध जिल्ह्यांतही काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या वतीने पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरू असल्याचा दावा करण्यात आला.काँग्रेसने इशारा दिला आहे की, TET पेपरफुटीप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत राज्यभर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

19 मिनिटे ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

24 मिनिटे ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

14 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

14 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

14 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

14 तास ago