महाराष्ट्र

TET पेपरफुटीप्रकरणी विधानभवनात शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे; NSUI चे आंदोलन

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन परिसरात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी व कार्यकर्ते विधानभवन परिसरात जमले होते. शिक्षणमंत्री दादा भुसे विधानभवनातून बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवण्यात आले. “पेपरचोर सरकार हाय हाय”, “दादा भुसे राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा”, “पेपरफुटी करणाऱ्यांना अटक करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी सागर साळुंखे यांनी आरोप केला की, राज्यात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. TET पेपरफुटीप्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी सागर साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, पोलिस कारवाईनंतरही आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवत विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, TET पेपरफुटीविरोधातील काँग्रेसचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्र युवक काँग्रेसने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर आज NSUI ने विधानभवनात आंदोलन छेडले. राज्यातील विविध जिल्ह्यांतही काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या वतीने पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरू असल्याचा दावा करण्यात आला.काँग्रेसने इशारा दिला आहे की, TET पेपरफुटीप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत राज्यभर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

25 मिनिटे ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

28 मिनिटे ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

34 मिनिटे ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

37 मिनिटे ago

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…

40 मिनिटे ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

50 मिनिटे ago