महाराष्ट्र

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांचा परिणाम असल्याचा घणाघात माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

महागाईसाठी प्रत्येकवेळी आखाती युद्धाला जबाबदार धरण्यावर टीका करत दानवे म्हणाले, “महागाईची समस्या युद्धाच्या आधीपासूनच गंभीर आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून राज्यात महागाई असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. पेट्रोल, वीज आणि उत्पादन शुल्कावरील वाढीव करांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जून २०२६ मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७४ डॉलरपर्यंत खाली आली असतानाही राज्यातील नागरिकांना महागडे इंधन का विकले जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरातील मोठ्या तफावतीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “शेतकऱ्यांना दुधाला अवघा ३० रुपये प्रतिलिटर दर मिळतो, तर मुंबई-पुण्यात ग्राहकांना तेच दूध ७० रुपयांना घ्यावे लागते. कांदा, तूर, हरभरा आणि गहू या पिकांचीदेखील अशीच परिस्थिती आहे. २०१४ च्या तुलनेत रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मग मधला पैसा नेमका कोणाच्या खिशात जात आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नोकरभरतीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत दानवे म्हणाले की, राज्यातील सुमारे सात लाख पदांपैकी दोन लाख पदे रिक्त आहेत. ७० हजार नोकरभरतीची घोषणा करण्यात आली, मात्र त्याचा ठोस आराखडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच ५ मे २०२६ रोजी ‘लघुलेखक’ पद मृत घोषित करण्याच्या निर्णयामुळे ५ ते १० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय तलाठी, म्हाडा आणि आरोग्य भरती प्रक्रियेतील विलंब व कथित घोटाळ्यांचाही उल्लेख करत दानवे यांनी सरकारच्या शेतकरी व तरुणविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपटातील गाण्याच्या ओळींचा उल्लेख करत सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी…

52 मिनिटे ago

डॉ. श्रीकांत शिंदे! विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख अधिक दृढ

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पायाभूत सुविधा, आरोग्य, वाहतूक आणि…

4 तास ago

परिणय फुके यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रतिउत्तर

मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे "चोराच्या उलट्या बोंबा"…

4 तास ago

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम…

4 तास ago

शेतकरी आत्महत्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा विधानसभेत सभात्याग.

मुंबई: राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा अत्यंत गंभीर मुद्दा आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार…

4 तास ago

राम कदमांचा नैतिकतेचा आव; ‘दुसऱ्याला सांगे ज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’; अमोल मातेले

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर हक्कभंगाची भाषा करून नैतिकतेचा…

6 तास ago