महाराष्ट्र

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांचा परिणाम असल्याचा घणाघात माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.

महागाईसाठी प्रत्येकवेळी आखाती युद्धाला जबाबदार धरण्यावर टीका करत दानवे म्हणाले, “महागाईची समस्या युद्धाच्या आधीपासूनच गंभीर आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून राज्यात महागाई असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. पेट्रोल, वीज आणि उत्पादन शुल्कावरील वाढीव करांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जून २०२६ मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७४ डॉलरपर्यंत खाली आली असतानाही राज्यातील नागरिकांना महागडे इंधन का विकले जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरातील मोठ्या तफावतीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “शेतकऱ्यांना दुधाला अवघा ३० रुपये प्रतिलिटर दर मिळतो, तर मुंबई-पुण्यात ग्राहकांना तेच दूध ७० रुपयांना घ्यावे लागते. कांदा, तूर, हरभरा आणि गहू या पिकांचीदेखील अशीच परिस्थिती आहे. २०१४ च्या तुलनेत रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मग मधला पैसा नेमका कोणाच्या खिशात जात आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नोकरभरतीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत दानवे म्हणाले की, राज्यातील सुमारे सात लाख पदांपैकी दोन लाख पदे रिक्त आहेत. ७० हजार नोकरभरतीची घोषणा करण्यात आली, मात्र त्याचा ठोस आराखडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच ५ मे २०२६ रोजी ‘लघुलेखक’ पद मृत घोषित करण्याच्या निर्णयामुळे ५ ते १० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय तलाठी, म्हाडा आणि आरोग्य भरती प्रक्रियेतील विलंब व कथित घोटाळ्यांचाही उल्लेख करत दानवे यांनी सरकारच्या शेतकरी व तरुणविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपटातील गाण्याच्या ओळींचा उल्लेख करत सरकारच्या कारभाराचा निषेध नोंदवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

12 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

12 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

15 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

16 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

16 तास ago