महाराष्ट्र

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी सदिच्छा भेट

मुंबई: जिष्णू देव वर्मा यांची काल मुंबई येथील ‘लोकभावन’ येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँकिंग सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे तसेच तांत्रिक शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपालांना दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या क्षेत्रात देशात नेहमीच अग्रस्थानी राहिले असून राज्यातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी शासनाचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील उच्च शिक्षण अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

11 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

11 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

11 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

11 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

13 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

13 तास ago