महाराष्ट्र

आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं वृद्धापकाळाने त्यांच्या गावी निधन झालं होत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्या दरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी पूनमचे लग्न पार पडलं होतं. विक्रम तुपे यांच्याशी ती लग्नबंधनात अडकली होती. आजोबांच्या विरहात नातीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

49 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

3 तास ago