जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत मराठा समाजाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. जात प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे शिंदे यांचाच हात असल्याचा दावा करत, “तुमच्यासाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, पण आता तुम्ही आम्हाला नाराज केले,” असे जरांगे म्हणाले.
जरांगे यांनी पुढे इशारा देत, “भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी २५ ते ३० आमदार पाडू शकतो. गरज पडली तर शिवसेनेच्या सर्व जागाही पाडून टाकीन,” असे विधान केले. तसेच, “फडणवीस आणि शिंदे यांनी मला तुरुंगात टाकले तरी मी घाबरणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांचा गैरसमज दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. “मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, कुणबी प्रमाणपत्रांचा मार्ग खुला केला, तसेच सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. ओबीसी समाजाचे नुकसान न करता मराठा समाजाला शक्य ते सर्व दिले. याची माहिती जरांगे यांनाही आहे,” असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, संभाजीनगरातील काही व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांबाबत झालेल्या कारवाईवरूनही जरांगे यांनी शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाठ आणि संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…
1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…