महाराष्ट्र

मुंबई पालिका मुख्यालयात पालकमंत्री लोढांचे दालन…

मुंबई: भाजपचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दालन सुरु झाल्याने आता नवा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इतर सर्व पक्षांची कार्यालये सील केली असताना आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या या दालनात भाजपच्या माजी नगरसेवकांची वर्दळ वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

पालकमंत्र्यांच्या नावाखाली हि तर भाजपने महापालिकेत केलेली घुसखोरी आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.फेसबुक पोस्ट करत मातेले यांनी मंगलप्रभात लोढा आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्ष आणि राज्य साकार चुकीचा पायंडा पाडत आहे. पालकमंत्री पदाच्या आडून राज्य सरकारने मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात कार्यालय दिले आहे. प्रशासक असतानाच्या काळात इतर राजकीय पक्षांची कार्यलये सील करून भारतीय जनता पक्षाला तिथे कार्यालय देणे साफ चुकीचे आहे. पालकमंत्री पदाच्या नावाखाली राज्य सरकारने हुकूमशाही आणि दडपशाहीच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेत एकप्रकारे घुसखोरीच केली आहे, अस आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी म्हटल आहे.

दरम्यान, आता मुंबई महापालिकेत असलेली लोढांच्या दालनावर वरून विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले असून विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना भाजप कशाप्रकारे उत्तर देतेय हे पाहावे लागेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

5 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

5 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

5 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

6 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

6 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

6 तास ago