महाराष्ट्र

‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ फक्त चौकटीपुरतेच उरले?

मालमत्तेच्या वादांमुळे ‘एकत्र कुटुंब’ संकल्पना धोक्यात

मुंबई: ‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आता केवळ घोषवाक्यापुरतीच उरली आहे की काय, असा प्रश्न निर्माण होईल इतपत देशभरात मालमत्तेचे वाद वाढताना दिसत आहेत. एकेकाळी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारी भारतीय कुटुंबं आज जमिनीच्या तुकड्यासाठी आणि घराच्या वाटणीसाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, आज दर तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून थंड युद्ध किंवा उघड संघर्ष सुरू आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ‘माझं आणि तुझं’ ही भावना अधिक बळावली असून, जमिनीच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबातील नातेसंबंध ताणले जात आहेत. या संघर्षात बाप-लेक, सख्खे भाऊ यांच्यातील नाती दुरावत चालल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.

या वादांचा सर्वाधिक फटका आजही मुलींनाच बसत असल्याचे वास्तव आहे. २००५ मध्ये हिंदू वारसा कायद्यात दुरुस्ती करून मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क देण्यात आला असला, तरी सामाजिक दबावामुळे अनेक घरांमध्ये मुलींना आपला वाटा मागण्यापासून रोखले जाते.

कायद्यानुसार, जी मालमत्ता सलग चार पिढ्यांपासून—पणजोबा, आजोबा, वडील—चालत आली आहे, तिला वडिलोपार्जित मालमत्ता मानले जाते. अशा मालमत्तेवर मुलगा आणि मुलगी या दोघांचाही जन्मत:च समान हक्क असतो. या संपत्तीची विक्री किंवा हस्तांतरण करताना कुटुंबातील सर्व सह-धारकांची संमती आवश्यक असते.

जर वडील किंवा भाऊ कायदेशीर वाटा देण्यास नकार देत असतील, तर संबंधित व्यक्ती वकिलांमार्फत लीगल नोटीस पाठवू शकते. त्यानंतरही तोडगा न निघाल्यास न्यायालयात फाळणीचा दिवाणी दावा दाखल करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. खटला सुरू असताना मालमत्ता विकली जाऊ नये, यासाठी न्यायालयाकडून मनाई आदेश (स्टे ऑर्डर) मिळवता येतो.

कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे की, मालमत्तेचे वाद वर्षानुवर्षे चालतात आणि यात पैसा तसेच नाती दोन्ही उध्वस्त होतात. त्यामुळे भविष्यातील वाद टाळण्यासाठी जिवंतपणीच मालमत्तेची कायदेशीर आणि स्पष्ट वाटणी करणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

38 मिनिटे ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

2 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

8 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

16 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago