मुंबई: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पदक’, तर उल्लेखनीय सेवेसाठी विविध विभागांतील ५२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.
स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या अधिकारी व जवानांचा हा गौरव महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. विशेषतः वीरता पदक प्राप्त जवानांनी दाखवलेले धैर्य राज्याची मान उंचावणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा अधिक बळकट करणाऱ्या सर्व पुरस्कार विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुनश्च अभिनंदन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…