महाराष्ट्र

पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा

नागपूर: काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वसनांची नेहमीच पूर्तता केली. युपीए सरकारनेही मनरेगा, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा दिला. आताही काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणातील जनतेल्या दिलेल्या गॅरंटींची पूर्तता यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी आकडेवारीसह स्पष्ट सांगत नरेंद्र मोदींनी १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री व ११ वर्ष पंतप्रधानपदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले याचा हिशोब द्यावा असे आव्हान दिले.

नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत २०० युनिट वीज मोफत दिली जात असून त्यासाठी ९६५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातील आतापर्यंत ५१६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासासाठी ५०१५ कोटी रुपयांची तरतूद केली असून २१०९ कोटी आतापर्यंत खर्च झाले आहेत. गृहलक्ष्मी योजनेसाठी महिलांना प्रति महिना २००० रुपये दिले जात असून २८ हजार ६०८ कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतुद केलेली आहे. या योजनेवर आतापर्यंत १३ हजार ४५१ कोटी खर्च झाले आहेत. अन्नभाग्य योजनेसाठी बीपीएल कुटुंबासटी ८०८० कोटींची तरतूद केली असून यातून २५८२ कोटी खर्च केले आहेत, बेरोजगार तरुणांसाठी युवानिधी योजनेअर्तंगत ६५० कोटी तरतूद आहे, त्यातून १०८ कोटी खर्च केले आहेत. पंतप्रधान मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे काही यंत्रणा नाही का, काहीही न पाहता, कोणतीही माहिती न घेता ते सर्रास खोटे बोलत आहेत.

भाजपाचे नेते भडकाऊ भाषण देत मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे. भाजपाने विकास कामे सांगून व थेट मत मागावे. योगी आदित्यनाथ यांच्या, बटेंगे तो कटेंगे, हा नारा आरएसएसला आवडतो. त्याच्याविरोधी नरेंद्र मोदींनी, एक है तो सेफ है चा नारा सुरु केला. मोदी व योगी बसून नेमका कोणता नारा द्यायचे ते ठरवावे. मारनेवाले, बांटनवाले तुम्हीच आणि दुसऱ्यांना बचेंगे तो कटेंगे सांगतात. देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? मोदी हे खोटं बोल पण रेटून बोल या नितीचा अवलंब करतात असेही खर्गे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात भाजपाने त्यांचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते सर्वांना कामाला लागले आहे. पण जनता आता त्यांना साथ देणार नाही. महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी मविआचे सरकार आणा असे आवाहनही खर्गे यांनी केले. आज नागपुरात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी दीक्षाभूमिवर जाऊन अभिवादन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

44 मिनिटे ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

59 मिनिटे ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

1 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

3 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

3 तास ago

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…

3 तास ago