आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुचाकीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या कार्बन मोनोऑक्साइड वायूच्या विषबाधेमुळे घरात झोपलेल्या दोन जुळ्या बहिणी, त्यांचा भाऊ आणि आजोबा अशा चौघांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरली नावाचा व्यक्ती हेअर सलून चालवतो. त्याने नुकतीच आपली दुचाकी दुरुस्त करून आणली होती. संबंधित मेकॅनिकने दुचाकीचे इंजिन रात्रभर चालू ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मुरलीने दुचाकी घराच्या आत उभी करून इंजिन सुरू ठेवले. ज्या खोलीत त्याची दोन मुले आणि वडील झोपले होते, त्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या. मुरली आणि त्याची पत्नी मात्र घराच्या टेरेसवर झोपायला गेले होते.
दरम्यान, दुचाकीच्या सायलेंसरमधून निघणारा धूर बंद खोलीत साचत गेला आणि त्यातून जीवघेणा कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार झाला. रात्रीच्या वेळी या विषारी वायूमुळे खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि झोपेतच चौघांचा गुदमरून मृत्यू झाला.
मृतांमध्ये चंदना (वय 8), चरिता (वय 8), कार्तिक (वय 15) आणि रामचंद्रय्या (वय 70) यांचा समावेश आहे. रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडल्यानंतर हे चौघेही मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कार्बन मोनोऑक्साइड हा रंगहीन आणि गंधहीन वायू असून त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. पेट्रोल, गॅस किंवा कोळसा अपुऱ्या हवेत जळल्यास हा वायू तयार होतो. बंद जागेत वाहनाचे इंजिन, जनरेटर किंवा रूम हिटर चालू ठेवल्यास हा वायू प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या उपकरणांचा वापर करताना पुरेशी हवा खेळती राहील याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…