महाराष्ट्र

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा थरार! महिलेवर झुंडीचा हल्ला; अंगाचे लचके तोडून ठार

चाकण: चाकण शहरातील पुणे–नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाच्या खाली एका ३२ वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सोमवारी (दि. १६ मार्च) सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला अत्याचार करून खून केल्याची चर्चा रंगली होती; मात्र घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

शोभा विजय वाघमारे (वय ३२, सध्या रा. चाकण, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास त्या पुणे–नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत दगड उचलले; मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर ती असहाय्य ठरली. कुत्र्यांनी अंगावरील कपडे फाडून शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा करत सुमारे १५ मिनिटे हा हल्ला सुरू होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह दिसताच त्यांनी चाकण उत्तर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, देवराम बुरुड, भैरोबा यादव, महेश कोळी, अक्षय सांडभोर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, चाकण आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी परिसरात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याच्या घटना वाढत आहेत.

लांडगा–कुत्रा संकराचा संशय

महिलेवर हल्ला करणारी कुत्री सकाळी पुन्हा त्या ठिकाणी घिरट्या घालताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्यांचे वर्तन अत्यंत आक्रमक असल्याने कुत्रा आणि लांडगा यांच्यातील जैविक संकर असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

9 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

9 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

9 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

11 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

23 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

23 तास ago