महाराष्ट्र

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा थरार! महिलेवर झुंडीचा हल्ला; अंगाचे लचके तोडून ठार

चाकण: चाकण शहरातील पुणे–नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाच्या खाली एका ३२ वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सोमवारी (दि. १६ मार्च) सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला अत्याचार करून खून केल्याची चर्चा रंगली होती; मात्र घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

शोभा विजय वाघमारे (वय ३२, सध्या रा. चाकण, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास त्या पुणे–नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत दगड उचलले; मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर ती असहाय्य ठरली. कुत्र्यांनी अंगावरील कपडे फाडून शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा करत सुमारे १५ मिनिटे हा हल्ला सुरू होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह दिसताच त्यांनी चाकण उत्तर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, देवराम बुरुड, भैरोबा यादव, महेश कोळी, अक्षय सांडभोर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, चाकण आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी परिसरात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याच्या घटना वाढत आहेत.

लांडगा–कुत्रा संकराचा संशय

महिलेवर हल्ला करणारी कुत्री सकाळी पुन्हा त्या ठिकाणी घिरट्या घालताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्यांचे वर्तन अत्यंत आक्रमक असल्याने कुत्रा आणि लांडगा यांच्यातील जैविक संकर असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

6 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

13 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

13 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

13 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

13 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

14 तास ago