महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा झटका; ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेल्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच होत चालली आहे. त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट नाव सोडत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणीत भरच पडली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचे निकटवर्तिय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. त्यामुळे मुंडे यांना दबाव वाढल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

औरंगाबाद खंडपीठात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध याचिका राजाभाऊ फड व करुणा शर्मा यांच्याकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये बोगस मतदान आणि शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली, माहिती दडवून ठेवली, असे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या 2014 सालातील विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान देणाऱ्या या याचिका आहेत. या दोन प्रकरणात प्रत्येकी पाच हजार, असे मिळून दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

त्यानंतर त्यांच्यावर करुणा शर्मा यांनी देखील काही गंभीर आरोप केले, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान आता त्यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोन निवडणूक संदर्भातील याचिकेत शेवटची संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नसल्याने, मुंडे यांच्याकडून 10 हजार रुपये वसूल करण्याचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या दोन निवडणूक संदर्भातील याचिकेत शेवटची संधी देऊनही लेखी उत्तर दाखल करण्यात आले नसल्याने, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल ( कोस्ट-शास्ती ) करून संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी, असे आदेश न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.

धनंजय मुंडे यांना नोटीसा देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे अखेर आठ ऑगस्टला झालेल्या सुनावणी वेळी, धनंजय मुंडे यांच्याकडून दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल करून, संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी ,असे आदेश देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भरच पडली आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

7 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

7 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

7 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

10 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

11 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

11 तास ago