महाराष्ट्र

तू आमदार कसा होतो तेच मी बघतो! अजितदादांनी ताकद लावली अन्…

पुणे: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला गळती लागली आहे. पुण्यातील काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार पक्षाचा हात सोडणार आहे. संग्राम थोपटे, रविंद्र धंगेकर यांच्यानंतर आता संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. ते पुरंदरचे माजी आमदार आहेत. १६ जुलैला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. हा कार्यक्रम सासवडला होण्याची शक्यता आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत संजय जगताप यांनी पुरंदर मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व केलं. २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे जगताप हे शिवतारेंचा पराभव करुनच आमदार झाले होते.

जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. यामुळे पुण्यात काँग्रेसची स्थिती आणखी तोळामासा झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात मोठा विस्तार केला आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठोपाठ आता संजय जगताप यांनीही काँग्रेसला रामराम केला आहे. या दोन्ही माजी आमदारांनी भाजपची वाट धरली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेली सभा राज्यभरात गाजली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकसंध होती. भाजपच्या कांचन कुल यांचं आव्हान सुळे यांच्यासमोर होतं. त्यांचा प्रचार शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार विजय शिवतारे करत होते. शिवतारेंनी केलेल्या टिकेला उत्तर देताना अजित पवारांनी सेना आमदाराला ओपन चॅलेंज दिलं होतं.

तू 2019 आमदार कसा होतो हेच बघतो, अशी धमकी अजित पवारांनी प्रचारसभेत भाषण करताना दिली होती. सुळेंवर टीका करणाऱ्या शिवतारेंच्या पराभवासाठी अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकद लावली. अख्ख्या महाराष्ट्राला माहित्येय, मी जर एखाद्याला ठरवलं एखाद्याला आमदार नाही करायचं, तर कोणाच्या बापाला ऐकत नाही, असं अजित पवार म्हणाले होते. शिवतारेंच्या पराभवासाठी अजित पवारांनी फिल्डींग लावली. काँग्रेसचे संजय जगताप ३१ हजार ४०४ मतांनी विजयी झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

7 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

7 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

7 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

9 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

21 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

21 तास ago