मुंबई: अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या तसेच संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करत राहणार असल्याचा ठाम इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सपकाळ म्हणाले की, काही भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस” जाहीर केल्याची माहिती आहे. त्यांनी उपरोधिकपणे म्हटले की, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, अन्यायकारक व्यापार करार रद्द होणार असतील, शेतमालाला योग्य भाव मिळणार असेल आणि शेतकरी कर्जमुक्त होणार असतील तर माझी जीभ जरूर कापा. तसेच हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणे थांबणार असेल आणि चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल, तर त्यासाठीही मी तयार आहे, असे त्यांनी ठणकावले.
छत्रपतींबाबत चुकीचे बोलल्याचा आरोप फेटाळताना सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण काहीही अवमानास्पद विधान केलेले नाही. महाराजांची कीर्ती चंद्राप्रमाणे वाढत राहावी, याबाबत दुमत नाही. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करून महाराष्ट्रात तणाव निर्माण करण्याचा आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.
सपकाळ यांनी पुढे दावा केला की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संवेदनशील मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हा सर्व प्रकार रचला जात आहे. अमेरिकेबरोबरच्या संभाव्य व्यापार करारामुळे देशातील शेतकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, तसेच महाराष्ट्रातील इतर ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नसल्याने मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.भाजपाने या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…