मुंबई: मुंबईकरांनी स्वागतासाठी शाल–पुष्पगुच्छ आणण्याऐवजी महापौर निधीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे.
महापौर म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन स्वतः महापौर निधीस देत असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही या निधीस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले. या निधीतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना मदत केली जाते.
महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक शाल व पुष्पगुच्छ घेऊन भेटीस येत आहेत. मात्र, या औपचारिक स्वागतापेक्षा गरिब रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत अधिक उपयुक्त ठरेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
नागरिकांना सुलभरीत्या देणगी देता यावी यासाठी क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात येत आहे. महापौर कार्यालयाच्या दर्शनी भागावर हा क्यूआर कोड लावण्यात येणार असून त्याद्वारे थेट महापौर निधीस देणगी देता येईल. नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद देऊन गोरगरिबांच्या आरोग्य सेवेत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…