मुंबई: मुंबईकरांनी स्वागतासाठी शाल–पुष्पगुच्छ आणण्याऐवजी महापौर निधीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे.
महापौर म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन स्वतः महापौर निधीस देत असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही या निधीस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले. या निधीतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना मदत केली जाते.
महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक शाल व पुष्पगुच्छ घेऊन भेटीस येत आहेत. मात्र, या औपचारिक स्वागतापेक्षा गरिब रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत अधिक उपयुक्त ठरेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
नागरिकांना सुलभरीत्या देणगी देता यावी यासाठी क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात येत आहे. महापौर कार्यालयाच्या दर्शनी भागावर हा क्यूआर कोड लावण्यात येणार असून त्याद्वारे थेट महापौर निधीस देणगी देता येईल. नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद देऊन गोरगरिबांच्या आरोग्य सेवेत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…