वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना
मुंबई: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ विकसित होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत रावल म्हणाले की, फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड आणि रॉटरडॅम परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर हा बाजार विकसित केला जाणार आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अशी त्रिस्तरीय विपणन व्यवस्था उभारण्याचाही शासनाचा मानस आहे.
या प्रकल्पात घाऊक व्यापार, आयात-निर्यात सुविधा, शीतसाखळी, ग्रेडिंग-पॅकेजिंग, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, गुणवत्ता परीक्षण केंद्र, कंटेनर टर्मिनल, रेल्वे सायडिंग, ई-लिलाव आणि निर्यात सुलभता केंद्र अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र सध्या देशाच्या कृषी निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, दापचरी प्रकल्पामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे काढणीनंतर होणारे नुकसान आणि वाहतूक खर्च 15 ते 20 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा असून, 10 हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. वाढवण बंदर, जेएनपीए, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसारख्या पायाभूत सुविधांशी जोडणीमुळे महाराष्ट्राची कृषी निर्यात अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या…
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार, कायद्यानुसार आणि नियमानुसारच झाल्याचा ठाम दावा…
महिला-बालकल्याण विभागाच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप; शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष शिरूर (अरुणकुमार…
सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ…
मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात…