महाराष्ट्र

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या पाठिंब्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. “बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय,” अशी बोचरी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे गटाची भूमिका “तुम लढो, हम कपडे संभालते हैं” अशी असल्याचा टोला लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, सरकारविरोधी कोणत्याही आंदोलनाला घरबसल्या पाठिंबा देणे ही उद्धव ठाकरे गटाची सवय झाली आहे. मात्र स्वतः कधीही रस्त्यावर उतरून नेतृत्व करण्याचे धाडस ते दाखवत नाहीत.

यावेळी त्यांनी विरोधकांवर देशात आणि राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. भारताची तुलना श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळशी करणे हा राजकीय स्वार्थ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारे आता रामरक्षा म्हणत आहेत. ‘जो राम का नाही, वो किसी काम का नाही’ हे त्यांना आता समजले आहे,” असे ते म्हणाले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

एनडीएची युती ही सत्तेसाठी नसून समान विचारधारेवर आधारित वैचारिक युती असल्याचे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, आम्ही कधीही बार्गेनिंग केले नाही आणि करणारही नाही.

पेपर लीक प्रकरणावर राहुल गांधी यांच्या टीकेलाही उत्तर देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात टीईटी पेपर लीकचा कट पोलिसांनी वेळेत उधळून लावला असून एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्यातील बेकायदा बॅनरप्रकरणी प्रशासनाला तातडीने सर्व बेकायदा बॅनर हटवण्याचे आदेश दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

निमगाव म्हाळुंगीच्या जिल्हा परिषद शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; सहा विद्यार्थ्यांचा जिल्हा गुणवत्ता यादीत समावेश

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती…

7 तास ago

शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची ‘खुर्ची’ संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?

खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…

8 तास ago

नाट्यछटा स्पर्धेसाठी 500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद,…

9 तास ago

शिक्षक भरतीचा मोठा टप्पा पूर्ण; १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस

मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…

18 तास ago

‘मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करा’; हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांना एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…

1 दिवस ago

रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्यांकडून सासरच्या छळाचा गंभीर आरोप

पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय…

1 दिवस ago