महाराष्ट्र

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या पाठिंब्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. “बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय,” अशी बोचरी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे गटाची भूमिका “तुम लढो, हम कपडे संभालते हैं” अशी असल्याचा टोला लगावला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, सरकारविरोधी कोणत्याही आंदोलनाला घरबसल्या पाठिंबा देणे ही उद्धव ठाकरे गटाची सवय झाली आहे. मात्र स्वतः कधीही रस्त्यावर उतरून नेतृत्व करण्याचे धाडस ते दाखवत नाहीत.

यावेळी त्यांनी विरोधकांवर देशात आणि राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. भारताची तुलना श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळशी करणे हा राजकीय स्वार्थ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारे आता रामरक्षा म्हणत आहेत. ‘जो राम का नाही, वो किसी काम का नाही’ हे त्यांना आता समजले आहे,” असे ते म्हणाले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत सत्ता स्थापन करून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

एनडीएची युती ही सत्तेसाठी नसून समान विचारधारेवर आधारित वैचारिक युती असल्याचे स्पष्ट करत शिंदे म्हणाले की, आम्ही कधीही बार्गेनिंग केले नाही आणि करणारही नाही.

पेपर लीक प्रकरणावर राहुल गांधी यांच्या टीकेलाही उत्तर देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात टीईटी पेपर लीकचा कट पोलिसांनी वेळेत उधळून लावला असून एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाण्यातील बेकायदा बॅनरप्रकरणी प्रशासनाला तातडीने सर्व बेकायदा बॅनर हटवण्याचे आदेश दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पशुसंवर्धन विभागाच्या बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्न; शंभरहुन अधिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘मॅट’ मध्ये धाव

मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या…

32 मिनिटे ago

वाघाच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांची वडेट्टीवारांकडून भेट; हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या…

36 मिनिटे ago

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची निवड पूर्णपणे वैध; नोटीसमध्ये तथ्य नाही; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार, कायद्यानुसार आणि नियमानुसारच झाल्याचा ठाम दावा…

40 मिनिटे ago

शासकीय कर्जाच्या आमिषाने शिरूरमध्ये १०० हून अधिक नागरिकांची लाखोंची कथित फसवणूक

महिला-बालकल्याण विभागाच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप; शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष शिरूर (अरुणकुमार…

46 मिनिटे ago

दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना…

1 तास ago

राजर्षी शाहू जयंती निबंध-काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; पत्रकार राजन पारकर यांना प्रथम क्रमांक

मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात…

1 तास ago