मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार, कायद्यानुसार आणि नियमानुसारच झाल्याचा ठाम दावा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे. सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसवजा पत्रात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाले की, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नियमानुसार बोलावण्यात आली होती. बैठकीतील सर्व कामकाज आणि अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांचे पालन करूनच पार पडली असून ती पूर्णपणे वैध आहे.
या प्रकरणावर लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात येणार असून, कायदेतज्ज्ञ आणि वकिलांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. आवश्यक वाटल्यास संबंधितांवर पक्षशिस्तभंगाची किंवा अन्य कारवाईचाही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली पातळीवर यासंदर्भात काही घडले असल्याची माहिती नसल्याचे सांगताना तटकरे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने पत्र लिहिल्याने पक्षात असंतोष आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. एका व्यक्तीचे मत म्हणजे संपूर्ण पक्षाची भूमिका नसते.पक्ष सध्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे आणि लोकशाही पद्धतीने कार्यरत असल्याचा पुनरुच्चारही सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती…
खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…
बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद,…
मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…
मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…
पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय…